आपली मातृभाषा ही मराठी, लहानपणापासून आपल्यावर
सुंदर आणि श्रीमंत असे मराठी संस्कार घडत आहेत. मराठी असल्याचा आणि मराठी
भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान आहेच. पण मराठी भाषा कधी उगम झाली तिच्या
निर्मितिचा इतिहास नक्की काय ह्याबद्दल नक्कीच मनात कुतूहल आहे, चला
थोडक्यात आपण जाणून घेऊया.
भारतातच नव्हे तर साऱ्या जगाची आद्य भाषा
म्हणजे संस्कृत आणि ह्याच संस्कृत भाषेमधून जन्मास आलेली म्हणजे मराठी
भाषा. जगातल्या जुन्या भाषांपैकी एक म्हणजे १३०० वर्ष किंवा त्याहून जुनी
अशी हि मराठी भाषा. भारतात सुमारे ९ कोटीहून अधिक लोक मराठी बोलू शकतात.
एकूण भाषिकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी आणि आणि भारतातील
चौथ्या क्रमांकाची भाषा आहे.
भारतात आणि संपूर्ण जगात 'दिवस'
म्हणजे टीपिकल 'डे' ज हे साजरे होतच असतात भले ते कसलेही असो. पण भाषा
दिवस साजरा करण्याचा मान हे आपल्या मराठीला लाभला आहे आणि आपल्या सर्वांसाठी
ही अभिमानाची गोष्ट आहे. किंबहुना हे आपले भाग्य आहे.
२७ फेब्रुवारी
हाच 'मराठी दिवस' म्हणून साजरा का केला जातो. ह्याच कारण म्हणजे ज्ञानपीठ
पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर अर्थातच कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस.
२७ फेब्रुवारी १९१२ रोजी कुसुमाग्रजांचा जन्म झाला. त्यांच्या सन्मानार्थ
आपण हा दिवस मराठी दिवस म्हणून साजरा करतो.
कुसुमाग्रजांची अनेक अजरामर
संग्रह आहेत त्यापैकी 'नटसम्राट' ह्या महान नाट्यकृतींसाठी त्यांना
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ' वेडात मराठे वीर दौडले सात' हे
अंगावर काटा आणणारे गाणे सुद्धा त्यांचेच. तसेच 'कणा', 'किनारा', 'प्रवासी
पक्षी' 'माधवी माती' अशी अनेक त्यांची अजरामर काव्ये आहेत. 'कल्पनेच्या
तीरावर', 'जान्हवी' , 'वैष्णव' नामक कादंबऱ्याही सर्वज्ञात आहेत. अशा थोर
कवींचा वाढदिवस म्हणून आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो.
दादासाहेब
फाळके ह्यांनी काढलेला राजा हरिश्चंद्र हा भारतातील प्रथम चित्रपट हा
सुद्धा मराठीच आहे.म्हणजे मराठी भाषेने चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली गेली
ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
मराठी ही महाराष्ट्र आणि गोवा
राज्यातील अधिकृत भाषा आहे. तसेच दादरा आणि नगर हवेली, दिव व दमण ह्या
केंद्रशासित प्रदेशांमध्ये मराठीचा अधिकृत दर्जा आहे. विलक्षण गोष्ट म्हणजे
भारतासह मोरेशस आणि इस्त्राइल मध्येही मराठी भाषा बोलली जाते. अमेरिका,
युरोप आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये जिथे मराठी भाषिक शिक्षण आणि
कामानिमित्त विखुरलेले आहेत अशा देशातसुद्धा मराठी भाषा प्रामुख्याने बोलली
जाते उलट आपले मराठी सण उत्सव तिथे साजरे होतच असतात.
मराठी -
मरहट्टे म्हणजेच मरण्यास व मारण्याससुद्धा तत्पर, जीव गेला तरी चालेल पण
कोणासमोर झुकणार नाही अशी आमची मराठ्यांची जात संपूर्ण देशात आदर आणि दरारा
असलेले मराठे आणि मराठी भाषा ही तत्कालीन प्रमुख आणि अत्यंत महत्वाची भाषा
होती त्यामुळे ब्रिटिशांनासुद्धा मराठी भाषेची दखल घ्यावीच लागली ह्याच
कारण म्हणजे भारतातील इतर योद्धा घराण्यांनी ब्रिटिशांसमोर नांगी टाकली पण
मराठेच पुरून उरत होते. किंबहुना पेश्वांच्या काळात तर मराठी ही प्रथम
क्रमाकांची भाषा होती कारण अर्ध्याहून भारतात मराठ्यांचाच डंखा होता.
भारतात
उच्चशिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर मराठी समाज आहे तसेच कला क्रीडा क्षेत्रात
देखील मराठी भाषिकांचा पगडा आहे हे आपल्याला सांगायलाच नको. त्यासाठी नावे
सांगावी तेवढी कमीच.
मराठी भाषा जर बघायला गेलो तर प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या शैलीनुसार वेगळ्या प्रकारे बोलली जाते. अनेक पोट भाषा आणि बोली
भाषा ह्या मराठी मध्ये समाविष्ट आहेत. उदा..कोकणी, अहिराणी, माणदेशी,
मालवणी, वऱ्हाडी, इस्त्रायीली मराठी इ. मराठी भाषा ही अगोदर मोडी लिपीत आणि
सध्या देवनागरी लिपीत लिहिली जाते.
मराठी भाषेचे किंवा तिच्या बदलाचे एकूण सहा कालखंड आहेत. ते अशाप्रकारे.
१) आद्य काल : इ. स १२०० पूर्व म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अगोदरचा काळ
२) यादव काल : इ. स १२५० ते इ. स १३५० - ह्याच काळात वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली.आणि संतांची परंपरा जन्मास आली
३)
बहामती काल : इ. स १३५० ते इ. स १६०० - सर्वात कठीण काल - मुसलमानांच्या
आक्रमणाचा काळ, ह्या काळातसुद्धा नृसिंह सरस्वती, जनार्दन स्वामी, चक्रधर
स्वामी, एकनाथ , भानुदास अशा अनेक संतांनी साहित्यात भर घातली.
४)
शिवकाल : इ. स १६०० ते इ. स १७०० - राजेंचा काल, भरभराटीचा काल, ह्याच
काळात स्वराज्याची स्थापना झाली. बहामती काळात झालेल्या फारसी शब्दांचा
वापर थांबवून संस्कृत वापरण्यास महाराजांनी प्रवृत्त केले.आणि मराठी भाषा
अगदी थाटात पुढे आली.
५) पेशवे काल : इ. स १७०० ते इ. स १८१८, अनेक
वाड्मय, लावणी, पोवाडे ह्यांची निर्मिती. अर्ध्याहून अधिक भारतात मराठी
भाषेचा विस्तार झाला.
६) इंग्रजी कालखंड : इ. स १८१८ ते आजतागायत. वर्तमान पत्रे, कथा, गद्य लिखाण, नाटकं, नियतकालिके आणि अनेक गोष्टींचा
भरभराट. इंग्रजी भाषेचा विस्तार वाढत असताना तग धरून राहिलेली आपली मराठी
भाषा
जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठे साहित्य हे आपल्या मराठी
भाषेला लाभले आहे. त्याचप्रमाणे भारतातील दर्जेदार चित्रपट हे मराठी भाषेतच
बनतात असे अनेक अमराठी कलाकार आणि दिग्दर्शकांचा म्हणणे आहे. नाटकं किंवा
एकांकिका ह्या इतर भाषेत लोप पावत आहेत किंबहुना नामशेष झाल्या आहेत तर
आपल्या मराठी नाटकांसाठी आजही प्रेक्षक तुडुंब गर्दी करताना दिसून येतात. प्रांतवाद, भाषावाद , इंग्रजीचा विस्तार अशा अनेक संकटांचा सामना करून
मराठी भाषा ही मराठ्यांप्रमानेच तग धरून राहिली आहे. आणि एका योद्ध्यासारखी
जणू काही सामना करत आहे. ह्यावरून कवी सुरेश भटांची एक कविता आवर्जून
म्हणावी लागेल.
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक आणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी. "
जय जगदंब जय दुर्गे
अंबज्ञ
Sources : wikipedia, marathmati.com,